कळसूबाई शिखर -एक अनुभव
मी वसंत मुरलीधर सालगुडे (नाशिक) श्री विलास, सुनिल, ज्ञानेश्वर शिवाजी खांडबहाले (महिरावणी ) आदि आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच असलेले कळसूबाईचे शिखर सफर करण्याचे ठरविले. आम्ही सर्वानी ठरवले की, दि. १५/१०/२०१७ रविवार रोजी पहाटे ५ वाजता कळसुबाई शिखर ट्रेकिंग साठी नाशिक हून निघून टाकेद मार्गे जायचे. परंतु निघताना थोडा उशीर होऊन सकाळी ६ वाजता टाकेदला निघालो. (१)सर्वतीर्थ टाकेद टाकेद नाशिक पासून साधारणतः ५२ किलोमीटर आहे. आम्ही नाशिकरोड हुन पांढुर्ली मार्गे टाकेद ला निघालो. व सकाळी ८.३० वाजता तेथे पोहचलो. सर्वतीर्थ टाकेद हे देखील अतिशय चांगले देवस्थान आहे. तेथे जटायूचे मंदिर व मोठे शिल्प आहे. रामायण काळात प्रभू श्रीराम ,लक्ष्मण सीता माई यांनी १४ वर्ष वनवास भोगताना नाशिक पंचवटी येथे वास्तव्य केले आहे. पंचवटी येथून 5सीता माईचे रावणाने अपहरण केले. व पुष्पक विमानाने लंकेला घेऊन जातांना जटायू पक्ष्याने त्यास प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा रावणाने जट